वयाच्या 50 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात

 *वयाच्या 50 वर्षापुढील सर्वांनी खालील दहा कृती टाळाव्यात:*


*1.  जीने चढू नका, गरजच असेल तर आधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे.*

*2.  आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा.*

*3.  आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा.*

*4.  आपला पायजमा उभ्याने  न घालता बसून घाला.*

*5.  झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका तर डाव्या अगर उजव्या कुशीवर वळून उठा.*

*6.  उलटे चालू नका त्याने गंभीर इजा होऊ शकते.*

*8.  खाली वाकून जड वस्तू उचलू नका तर आधी गुडघ्यात वाकून मग उचला.*

*9.  झोपेतून उठताना जलद न उठता प्रथम काही मिनिटे शांत बसून मग उठा.*

*10.  संडासला जोर लावू नका नैसर्गिक होऊ द्या.          अजून महत्त्वाचे नेहमी कृतिशील रहा व सकारात्मक विचार ठेवा कारण आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर आता खरे जीवन आनंदी जगण्याची वेळ आहे.*


*●  वरचेवर मित्रांच्या,  मैत्रीच्या संपर्कात जरूर रहा मनसोक्त पैसे वेळ खर्च करा*


*●  आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल,  तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.*


*●  मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ?  आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपणास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.*


*●  आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका.  कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?* 

     

*●  जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!* 


*●  तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका.  त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या.  स्वतःचे भविष्य घडवू द्या.  त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .* 


 *●  मुलांवर प्रेम करा त्यांची काळजी घ्या,  त्यांना भेटवस्तुही द्या.  मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडी निवडीवर करा*


*●  जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा*


*●  आपल्या आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत.  पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .* 


*●  या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल* .


 *●  तुमच्याकडे कितीही एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ?*            *तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !*


*●  एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात  एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात हे लक्षात असू द्या.* 


*●  आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.*

 

*●   सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे, उदात्त आहे त्याकडे पहा.  त्याची जपणूक करा*


*●  आणी हो,  तुमच्या मित्रांना / मैत्रीणींना कधीही विसरु नका त्यांना जपा,  हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणी इतरांनाही हवेहवेसे वाटाल.*


*●  मित्र-मैत्रीण नसतील तर*

*तुम्ही नक्कीच एकटे आणी एकाकी पडाल.*


*●   त्यासाठी रोज व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात रहा हसा, हसवत रहा मुक्त दाद द्या*

        *म्हणूनच म्हणतो आयुष्य खुप कमी आहे ते आनंदाने जगा ...*


*●  प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा..!*


*●  क्रोध घातक आहे त्याला गाडुन टाका..!*


*● संकटे ही क्षणभंगुर आहेत*

*त्यांचा सामना करा..!*


*●  डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण ....*


*●  काळाच्या पडद्या आड गेलेले "जीवलग" परत कधीच दिसत नाहीत ....*


        *!! मित्र जपा मैत्री जपा!!*


       *सध्याच्या या कठीण परिस्थितीतून आपण  सर्वजण कोरोनाला हरवून  नक्कीच सुखरूप बाहेर पडू....*

       *स्वतःची काळजी घ्या, घरी रहा सुरक्षित रहा.*


      *_जरी आपण ज्येष्ठ नागरिक नसाल तरी हा मेसेज सर्व जेष्ठ नागरिकांना अवश्य पाठवा.                                                                                       🙏  🙏


🌷💐🌷💐🌷💐

Comments

Popular posts from this blog

ज्यांना आपली किंमत नाही अशा व्यक्तीपासून दूर रहा.

पक्षी मरतांना कुठे जातात ?

इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?