महाभारताचे "नऊ सार सूत्र".

 *महाभारताचे "नऊ सार सूत्र".*


 *१) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल" - कौरव.*


  *२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील."- कर्ण.*


 *३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल."- अश्वत्थामा.*


 *४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह.*


 *५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन.*


 *६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते."- धृतराष्ट्र.*


 *७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे." - अर्जुन.*


 *८) "प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही."- शकुनी.*


 *९) "नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही." - युधिष्ठिर.*


         *या नऊ सूत्रांकडून धडा घ्या, अन्यथा महाभारत होणे निश्चित आहे.*


          *जो इतरांना संपविण्याची तयारी करतो, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.*


             *दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा.अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे कळत नाही*


               *"माणसाचा दर्जा हा जात, धर्म व मिळकती वरून ठरत नसतो, तर तो माणुसकीच्या विचारांवरून ठरत असतो . धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही."*


*आयुष्य सुंदर व अनमोल आहे.आनंदात जगावे..*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

ज्यांना आपली किंमत नाही अशा व्यक्तीपासून दूर रहा.

पक्षी मरतांना कुठे जातात ?

इथे बलात्काराला सुद्धा धर्म असतो?